नागरी समस्या निवारण केंद्रांद्वारे आतापर्यंत 395 तक्रारींचे निराकरण
Date : 23 Jun 2022
नागरिकांना भेडसावणाऱ्या सिवेज, पाणी, स्वच्छता, पथदिव्यांबद्दलच्या तक्रारी नोंदविण्यासाठी नागरी समस्या निवारण केंद्र उघडण्यात आले आहे. त्याचा फायदा आज नागरिकांना होताना दिसून येत आहे. प्रत्येक झोनमधील नागरी समस्या निवारण केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजतापर्यंत सुरू असून पावसाळा सुरू झाल्यानंतर सदर कक्ष पूर्ण वेळ 24 तास कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत लक्ष्मीनगर झोनमध्ये प्राप्त एकूण 53 तक्रारी मधून एकूण 38 तक्रारी, धरमपेठ झोनमधील 52 तक्रारींपैकी 47 तक्रारी,हनुमाननगर झोनमधील 219 तक्रारीपैकी 185 तक्रारी, धंतोली झोनमधील 47 तक्रारीपैकी 31 तक्रारी, नेहरुनगर झोनमधील 32 तक्रारीपैकी 21 तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच गांधीबाग महाल झोनमधील 27 तक्रारीपैकी 14 तक्रारी, सतरंजीपूरा झोनमधील 37 तक्रारीपैकी 26 तक्रारी, लकडगंज झोनमधील 04 तक्रारीपैकी 03 तक्रारी, आसिनगर झोनमधील 34 तक्रारीपैकी 20 तक्रारी, मंगळवारी झोनमधील 11 तक्रारीपैकी 10 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे नागरिकांनी आपल्या तक्रारी संबंधित झोन कार्यालयात नोंदवून मनपाच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.