तिरंगा सायकल रॅलीद्वारे एकतेचा संदेश
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : मनपाद्वारे आयोजन
Date : 14 Aug 2022
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, बायसिकल मेयर डॉ. अमित समर्थ, नरूल हक, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्यासह मनपा आयुक्त श्री. राधाकृष्ण बी. यांच्या पत्नी उपस्थित होत्या.
पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड या संदेशासाठी बनारस येथून २०२१ पासून सायकलद्वारे भारत भ्रमणावर निघालेले श्री. प्रदीप आणि श्री. हिंमत सिंग यांनी रॅलीत सहभागी होऊन सर्वांचा उत्साह वाढविला. अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी मनपाचा मानाचा दुप्पटा गळ्यात टाकून दोघांचेही स्वागत केले. ८० वर्षीय श्री. शिंदे यांनी सायकल रॅलीमध्ये सहभागी होऊन उपस्थितांना प्रोत्साहित केले. त्यांचेही स्वागत श्री. राम जोशी यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण नागपूर शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांना नागपूरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने देशाच्या अस्मितेचा गौरव म्हणून राबविण्यात येत असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानात प्रत्येक नागपूरकराने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड या संदेशासाठी बनारस येथून २०२१ पासून सायकलद्वारे भारत भ्रमणावर निघालेले श्री. प्रदीप आणि श्री. हिंमत सिंग यांनी आपल्या प्रवासाबद्दल यावेळी माहिती दिली. ऑक्टोबर २०२१ पासून पश्चिम बंगालपासून सायकल यात्रेला सुरूवात केली. वृक्षलागवड आणि वायू प्रदूषण नियंत्रण या दोन महत्वाच्या बाबींवर कार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशात १ लाख झाडे लावण्याचे लक्ष्य असून त्यादृष्टीने कार्य सुरू आहेत. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन जनजागृती करीत असून आतापर्यंत ६७ शाळांमध्ये जनजागृती केल्याचेही त्यांनी सांगितले. संपूर्ण भारताला स्वच्छ आणि हिरवे करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.